राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ शिवतीर्थावर घेतली आहे तसेच त्याच बरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्याही दोन-दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या बंगल्याचे ही वाटप करण्यात आलेले आहे. तर लवकरच नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी राहण्यास जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या बंगल्याची आज पाहणी करणार आहेत. इथे राहायला येणारे मुख्यमंत्री आपापल्या आवडीनुसार हा बगला सजवत असतात. आता रश्मी ठाकरे स्वतः या बंगल्याची नवी रचना कशी असावी, याबाबत त्या अधिकाऱ्यांना सूचना देणार आहेत.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री सोडणार का असा प्रश्न सर्वांनाच पडल होता.