Skip to content Skip to footer

राज्यपाल आमदारांच्या निवडी लवकर व्हाव्यात, महाविकास आघाडीची मागणी…

राज्यपाल आमदारांच्या निवडी लवकर व्हाव्यात, महाविकास आघाडीची मागणी…

कोरोनाच्या संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरात लवकर निवड व्हावी, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात येणार आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात येथे काल महाविकासआघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात या मुद्द्यावर बराचवेळ चर्चा सुरु होती.

नंतर या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले. राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी संयमाची भूमिका घेतली असली तरी आता फारच उशीर होत असल्याने राज्य सरकार आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना विनंती करणार आहे.

Leave a comment

0.0/5