Skip to content Skip to footer

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही ! कडक कारवाईचे आदेश.. – मुख्यमंत्री

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही ! कडक कारवाईचे आदेश.. – मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील दादर येथील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड त्यांनी केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून उठताना दिसत आहे.

राजगृहाचा-अवमान-करणाऱ्या-Contempt-of-the-palace

यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता वक्तव्य केले आहे. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी आपले मत मांडले आहे.

Leave a comment

0.0/5