Skip to content Skip to footer

नारायण राणेंना आता कामधंदा उरला नाही, ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत – गुलाबराव पाटील

नारायण राणेंना आता कामधंदा उरला नाही, ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत – गुलाबराव पाटील
 
                भाजपा नेते नारायण राणे यांनी ‘नाणार’ प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या आरोपाला शिवसेनेचे धडाकेबाज मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत अशा शब्दात राणे यांची गुलाबराव पाटील यांनी खिल्ली उडवली आहे.
                 नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा TRP म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते अशी टीका त्यांनी राणेंवर केली आहे.
              नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही असा टोला सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंना लगावला.

Leave a comment

0.0/5