Skip to content Skip to footer

एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे काय?, उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण.

एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचे काय?, उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या संकटात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे भाजपाकडून ठाकरेंच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. अशातच भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचं म्हणत त्यांना एक निवेदनही दिले. दरम्यान, एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर “एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असल्या तरी त्याबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल,” असं स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापू्र्वीच घेतला आहे. त्या निर्णयानंतर एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे किंवा काही जण ते जाणीवपूर्वक निर्माण करत आहेत. ज्या पद्धतीने इतर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतला आहे. तसाच याबाबतही योग्य निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. यासंदर्भात “कोणीही मनात शंका ठेवू नये, तसंच कोणत्याही संभ्रमावस्थेला आणि गैरसमजाला बळी पडू नका. यासंदर्भातील चर्चा युद्धपातळीवर सुरू आहे,”असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5