अर्शद वारसीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक, “असा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल”
सध्या एकीकडे राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाने राज्यात थैमान घातले आहे. अशा कठीण प्रसंगात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे.
अतिशय धीराने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर अभिनेता अर्षद वारसीने कौतुकाचा वर्षाव केला आहे. आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळातच एवढ्या मोठ्या संकटांना मुख्यमंत्र्याना तोंड द्यावं लागतंय, असे अभिनेता अर्षद वारसींनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंच्या याच संकटाशी सामना करण्याच्या प्रयत्नाचं अभिनेता अर्षद वारसीने कौतुक केलंय. अनेकांना आपल्या अभिनयाने भुरळ घालणाऱ्या अर्षद वारसीने ट्विट करुन उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलं आहे.
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone…🤦♂️
— Arshad Warsi (@ArshadWarsi) June 3, 2020
“मला वाटत नाही, दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यांनी नुकताच आपल्या खुर्चीचा पदभार घेतला अन् जागितक महामारी असलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. मुंबई सारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोना अन् आता निसर्ग चक्रीवादळाचा सामना या मुख्यमंत्र्यांना करावा लागत आहे”, वारसी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.