मनसे जिल्हाध्यक्षांनी उगारली मनपा उपायुक्तांवर खुर्ची….!.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात मुंबईत पाठोपाठ औरंगाबाद शहरात सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे डॉक्टर, नर्स आणि प्रशासकीय कर्मचारी कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र असे असताना औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर खुर्ची उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
एकीकडे कोरोनाच्या संकटात प्रशासन कर्मचारी जीवाची बाजी लावत कामावर येत असताना त्यांना याप्रकारे मारहाण करणे हे निंदनीय आहे. खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या संकटात काम करणाऱ्या कोरोना योद्धयांचे अनेकवेळा कौतुक केले आहे. मात्र काम करत नाही असे आरोप करून एका सरकारी अधिकाऱ्यावर खुर्ची उचलणे हे कितपत योग्य आहे याचा जिल्हाध्यक्षांनी विचार केला पाहिजे. यावर पक्षांतर्गत काय कारवाही होते हे पाहावे लागेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी मांडल्या आहेत.