Skip to content Skip to footer

मोदीजी गप्पा खुप झाल्या, काँग्रेसचे मोदींवर टिकास्त्

मोदीजी गप्पा खुप झाल्या, काँग्रेसचे मोदींवर टिकास्त्

सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या संख्येतमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात आणि राज्यात वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळे अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मत पंतप्रधानांनी मांडले आहे. यावर आता काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली आहे.

गप्पा खूप झाल्या पण कोरोनाशी लढण्याचा रोडमॅप काय आहे? असा सवाल करत काँग्रेसने पंतप्रधान मोदींना सात प्रश्न विचारले असून देशाला या सप्तपदीची उत्तरे द्या, असे आव्हान दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या देशाला उद्देशून केलेल्या संबोधनानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींवर टिकास्त्र सोडले आहे

Leave a comment

0.0/5