Skip to content Skip to footer

पंतप्रधान मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री ठाकरेंनी वाहिली शहीद जवानांना श्रध्दांजली…..!

पंतप्रधान मोदी यांच्या सोबत मुख्यमंत्री ठाकरेंनी वाहिली शहीद जवानांना श्रध्दांजली…..!

भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या २० जवानांना आज पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच देशातील अन्य १५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. भारत-चीन सीमेवरील परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र त्यापूर्वी कोरोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी शहीदांना दोन मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.

कोरोनाचा देशात उद्रेक झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला आहे. आजच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीतर तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर (मुख्यमंत्री नसल्यानं सचिव व वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होते), तेलंगणा, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदींनी चर्चा केली.

Leave a comment

0.0/5