Skip to content Skip to footer

कोरोना संसर्गामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

कोरोना संसर्गामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

सध्या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरावर कोरोनाचे संकट उभे थाटले आहे. त्याच पाश्वभूमीवर यावेळी होणारे संसदेतील हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती आता समोर येत आहे.

त्यात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी या निर्णयाला सर्वांनी अनुमती दर्शवली आहे. त्यामुळे आता थेट जानेवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल अशी माहिती कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेली आहे.

मात्र काँग्रेसने यावर आक्षेप घेत आमच्याशी चर्चा करण्यात आलेली नाही असे म्हंटले आहे. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली पण करोनामुळे हिवाळी अधिवेशन बोलवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले होते” असे प्रल्हाद जेशी यांनी अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. “करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता, हिवाळयाचे महिने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत” असे जोशी यांनी अधीररंजन चौधरींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5