राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपले तोंड पुन्हा उघडलेले आहे. यावेळी त्यांनी भाजपाच्या बड्या नेत्यांवर टीका करून भाजपाचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचा केविलवाणा प्रयोग केलेला दिसून येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते गिरीश बापट आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा उल्लेख बिनडोक म्हणून केला आहे. मिशन शक्ती अभियान यशस्वीपणे पूर्ण करत अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य भारताने सिद्ध केले आहे. ओडिशाच्या बालासोर किनारपट्टीजवळील एपीजे अब्दुल कलाम बेटावरील तळावरून क्षेपणास्त्राने अवकाशातील उपग्रह नष्ट करण्यात आला, नष्ट करण्यात आलेला उपग्रह हा पूर्वी भारतानेच प्रक्षेपित केलेला मात्र सध्या वापरात नसलेला असल्याचं सांगण्यात येत आहे.
या यशश्वी कामगिरी बद्दल मंत्री पाटील आणि बापट यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले परंतु माहितीच्या अभावी त्यांनी चुकीची माहिती चालू सभेत दिली होती. परंतु भाजपा नेत्यांनी अभिनंदन तरी केले परंतु राष्ट्रवादीचे नेते मंडळींनी शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरी बद्दल सुद्धा अजून त्यांचे अभिनंदन करू शकले नाही ही खंत बोलली जात आहे. आज कुठेतरी बड्या बड्या नेत्यांवर आरोप करून प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करताना आव्हाड दिसत आहे. यावर लवकरच भाजपा नेते आव्हाडांना उत्तर देतील अशीच सध्या तरी बातमी वर्तवली जात आहे. परंतु पुन्हा एकदा आपण कोणावर आरोप करतोय आणि कोना व्यक्ती बद्दल बोलतोय ही पातळी पाहूनच आव्हाडांनी बोलने करावे असा सल्ला सध्या तरी त्यांना दिला जात आहे.