सहा आमदारांचे साठ आमदार कसे करायचे, याची शरद पवार यांना चांगली जाण आहे. जे असतील त्यांना सोंबत घेऊन, तर जे आडवे येतील त्यांना आडवे करून नव्या स्वराज्याचा लढा राष्ट्रवादी काँग्रेसने उभारला आहे. नव महाराष्ट्र घडविण्यासाठी या लढ्याला साथ द्या, व येणाऱ्या निवडणुकीत राज्यात परिवर्तन घडवा,’ असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेत केले आहे.
परंतु सहा आमदारांचे साठ आमदार करायला तो काय सट्टा नाही. आज अमोल कोल्हे आपण वापरात असलेली भाषा आपल्या सारख्या व्यक्तीला न शोभणारी आहे. आज सुद्धा जयंत पाटील, सुनील तटकरे, भास्करराव जाधव यांच्यासारखे वरिष्ठ नेते मंडळी राष्ट्र्वादीत आहेत. परंतु ते सुद्धा बोलताना संयम बाळगुन भाषण करतात आज आपण छाताडावर पाय ठेऊन सरकार आणण्याच्या ज्या बाता करताय ते सुद्धा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना न पटणारे वक्तव्य आहे.