Skip to content Skip to footer

पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात

पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात सत्ता आली तर १० रुपयांमध्ये जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेनेने आपल्या वाचनाम्यात केली आहे. शरद पवारांनी या मुद्द्यावरून निशाणा साधल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी याला प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, पण त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची पोटं उपाशी आहेत. अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

शरद पवारांनी दुष्काळी भागासाठी काय केल? चारा छावणी आणि जनतेला पाणी नाही. शरद पवार आता बोंबलत फिरत आहेत. पण यापूर्वी पवारांनी हे का नाही केले?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. बाळासाहेबांना अटक करणं ही चूक झाली, असं शरद पवार म्हणतात मग माफी का मागत नाही? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

भाजपला पाठिंबा दिला नसता तर हे सरकार पडले असते. सरकार हलतं डुलतं झाले असते. आमच्यामुळे हे सरकार तरलं. मी सत्तेत असूनही बोलतो. या सरकारच्या चांगल्या कामात शिवसेनेचाही वाटा आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. तसंच दुष्काळाचे चक्र भेदण्यासाठी वॉटर ग्रीड आणणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरें यांनी दिले आहे.

हे ही वाचा -: 

शिवसेना प्रमुखांच्या अटकेप्रकरणी अजित पवारांनी भुजबळांचे नाव घ्यावे – उद्धव ठाकरे

Leave a comment

0.0/5