Skip to content Skip to footer

संदीप क्षीरसागर यांच्या पंचायत समिती ताब्यात घेण्याच्या वक्तव्यावरून बीड मध्ये शिवसंग्रामचे कार्यकर्ते पेटले !

विधानसभेची निवडणूक जवळ आली व विविध भागातील वातावरण गरम होत चालले आहे. बीड येथील प्रचार सभेत बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, विधानसभेच्या निवडणूका संपताच १ महिन्याच्या आत पंचायत समिती ताब्यात घेणार. पंचायत समितीवर सध्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामची सत्ता आहे, बजरंगी लढाईत मेटेंनी व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून संदीप क्षीरसागरांना मदत केली. बीड मध्ये सध्या सोशल मीडिया वरती संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त केला जात आहे व शिवसंग्रामचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. “विसरलात का बजरंगी लढाईत संग्रामी काय तडपेने लढले होते, मेटे साहेबांनी शेतकरी पुत्र हा शब्द उच्चारला आणि आम्ही गगन भेदी घोषणा दिल्या आणि निवडणूक झाल्यावर म्हणे एक महिन्यात पंचायत समिती ताब्यातून घेणार हे उपकार फेडले का साहेबांचे असो तुम्ही जगजाहीर नियत दाखवली आम्ही आमची धमक दाखवू” अश्या प्रकारचे संदेश जागोजागी फिरत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावरती असे वक्तव्य करून संदीप क्षीरसागर यांनी आपल्याच विरोधात नवीन युद्ध सुरु करून घेतले आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते संदीप क्षीरसागर यांना अद्दल घडवणार का हे चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

Leave a comment

0.0/5