Skip to content Skip to footer

बाळासाहेब थोरातांचा भाजपाच्या शेलारांना टोला

तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहित नाही म्ह्णून ते असे बोलत आहे. असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बाळासाहेब थोरातांनी भाजपा नेते आशिष शेलार यांना लगावला आहे. तर गडकरी आमचे मित्र आहे आणि क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपाला बॉल दिसत नाही आहे असा टोला सुद्धा भाजपाला लगावला होता.

मुख्यमंत्री-माजी मुख्यमंत्री राज्यपालांना खूप उशीर भेटले, आम्ही आधीच राज्यपालांना भेटलो, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळावी म्हणून आधी विनंती केली. लवकरच सत्ता स्थापन होईल, तुम्हांला जास्त वेळ थांबावे लागणार नाही. मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री याबाबत दिल्ली स्तरावर निर्णय होतील असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5