जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याच्या हातात बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे . आमदार पी.एन. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, अर्चना पाटील यांच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. २०१४ मध्ये युती सरकार अस्तित्वात आल्यावर बँकेवरील प्रशासक राजवट मागे घेण्यात आली. त्यानंतर बँकेवर संचालक मंडळ अस्तित्वात आले.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्यच्या नेत्यांनी काही जागा वगळता संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध केली. बँकेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य मोठ्या प्रमाणात असल्याने अध्यक्षपदी आमदार हसन मुश्रीफ यांची निवड झाली. गेली साडेचार वर्षे आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेचा उत्तम कारभार करत बँक नफ्यात आणली आहे..