Skip to content Skip to footer

नशीब… कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचेही गुन्हे सरकारने मागे घेईल

राज्यातून भाजपाची सत्ता गेल्यामुळे भाजपाच्या नेत्यांना काय बोलावे याचे भान राहिले नाही आहे असा काहीसा प्रकार भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी केलेला आहे. भिमा-कोरेगाव, मराठा मूक मोर्चा आंदोलकांची तुलना थेट कसाब याच्याशी केलेली आहे. त्यामुळे अवधूत वाघ यांच्यावर सर्व स्थरातून टीका होताना दिसत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताचं विविध मागण्यासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे. मराठा आंदोलक, धनगर आंदोलक, नाणार प्रकल्प आंदोलक तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी केवळ संशयित असणाऱ्यांवरील सर्व खटले आणि गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी राजकीय स्तरातून होत आहे.

हाच धागा पकडत भाजप नेते अवधूत वाघ यांनी महाविकासआघाडीवर टीकात्मक ट्विट केले आहे. “नशीब… कसाबला फाशी झाली. नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते, असे ट्विट वाघ यांनी केले होते.

Leave a comment

0.0/5