Skip to content Skip to footer

पालघर घटनेमागे भाजपचा हात काँग्रेसचा गंभीर आरोप

पालघर घटनेमागे भाजपचा हात काँग्रेसचा गंभीर आरोप

मागच्या काही दिवसापासून पालघर येथे घडलेल्या घटनेमुळे राज्यात नाही तर देशातील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी अनेक जण भाजपचे कार्यकर्ते निघाले होते त्यामुळे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला होता. त्यातच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घटनेमागे भाजपाचा हात होता असा खळबळजनक आरोप लावला आहे.

पालघर प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत परंतू या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने आणखीही पक्षातून काढून टाकले नाही, यावरून ही शंका अधिक गडद होते की पालघरच्या घटनेमागे भाजपचाच हात आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. सोशल मीडियावरून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी हा गंभीर आरोप भाजपावर लावला आहे.

Leave a comment

0.0/5