Skip to content Skip to footer

दानवे यांच्या वक्त्यव्याचा संजय राऊत यांनी घेतला खरपूस समाचार

दानवे यांच्या वक्त्यव्याचा संजय राऊत यांनी घेतला खरपूस समाचार

देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२-१४ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य करताना, शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला होता. आता त्यांच्या या वक्त्यव्याचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

केंद्र सरकारने रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य गांभीर्यानं घ्यावे. सरकारने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, कारण जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. शेतकरी आंदोलनाचा चीन, पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या रावसाहेब दानवे यांना संजय राऊत यांनी असा खोचक टोला लगावला आहे.

Leave a comment

0.0/5