Skip to content Skip to footer

राज्यपालांनी शेतकऱ्यांची भेट नाकारल्यामुळे अजित पवार संतापले

राज्यपालांनी शेतकऱ्यांची भेट नाकारल्यामुळे अजित पवार संतापले

मुंबईत सोमवारी शेतकऱ्यांचा मोर्चा पार पडला. संयुक्त कामगार-शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सहभागी झाले होते.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ भेट न घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्यपाल शेतकरी नेत्यांना भेटले नाही या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही अशी माहिती मला मिळाली. मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे असा टोला अजित पवारांनी लगावला होता.

Leave a comment

0.0/5