राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांवर टीका हे दुर्दैवी – उज्वल निकम
सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवला असून ही घटना अतिशय निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ् उज्वल निकम यांनी व्यक्ती केली आहे. सध्या देशभरात सुशांत सिह राजपूत प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ती आत्महत्या आहे, की त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले की हत्या असा विषय घेऊन बिहार पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांवर ज्या उघडपणे हल्ला चढविला आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. पुढील काळात या गोष्टीचे दूरगामी परिणाम होणार आहेत, असे मत उज्वल निकम यांनी मांडले आहे.
पुढे बोलताना उज्वल निकम यावेळी म्हणाले की, यापुढे एखाद्या गुन्हेगाराला लपायचं असेल तर त्याला विदेशात जायची आवश्यकता राहिली नाही. कारण तो जर बिहारमध्ये जाऊन लपला तर बिहार पोलीस महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य करणार नाहीत असे निकम यांनी बोलून दाखविले होते.