मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे.
तसेच ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे. हे विधेयक मांडताना अमित शाह यांनी काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीर हासुद्धा प्रदेश येतो. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी बेहत्तर, पण पाकव्याप्त काश्मीरही आमचाच आहे अस आक्रमक विधान केले आहे. या चर्चेत कॉंग्रेसच्या नेत्यांनीही सहभाग नोंदवला यात अधीर रंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.