काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडलेआणि मित्रपक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही पण भाजपात मानसन्मान दिला जातो असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. भाजपात दिलेला शब्द पाळला जातो तसेच फसवणूक होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्ष मी कुठल्या पदावर नव्हतो तरी पक्षासाठी खूप केलं. काँग्रेसमधून जाताना मी काँग्रेसचे उपकार ठेवले नाहीत, मी उलट काँग्रेसवर उपकार करून आलोय असे बोलून हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
मागील पाच वर्ष शेतीच्या पाण्याची समस्या, नवीन उद्योगधंदे नाही, प्रशासनावर वचक नाही अशी परिस्थिती मतदारसंघात आहे. पाच वर्षात झालेल्या चुका आत्मपरीक्षण करून सुधारल्या पाहीजेत. इंदापूरची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांची निवडणूक राहीलेली नाही ती निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे काँग्रेस, राष्ट्रवादीतील लोक का सोडून जातात ? याचे दोन्ही पक्षांनी आत्मपरीक्षण करावे असा टोलाही दोन्ही काँग्रेस पक्षांना लगावला.