Skip to content Skip to footer

हो आम्ही शिवसेनेला फसवलं ! – मुनगंटीवार यांनी केले मान्य

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षाने आपल्या जुन्या मित्र पक्षाची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली होती. परंतु उदयास आलेल्या या महाविकास आघाडीला खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आडमुठेपणा आणि हट्टच कारणीभूत ठरलेला होता, असे दबक्या आवाजाने भाजपा नेते सुद्धा आता बोलून दाखवत आहे.

आज महाविकास आघाडी घेत असलेल्या निर्णयामुळे येणारी १५ वर्ष सत्ता ही महाविकास आघाडी उपभोगणार असल्याची कल्पनाच भाजपा नेत्यांना आलेली आहे. म्हणून आपण केलेल्या चुकीची कबुली खुद्द भाजपाचे नेते देताना दिसत आहे. अशीच कबुली माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “होय आम्ही निवडणूक निकालानंतर शिवसेनेला फसवले. आम्ही चुकलो मात्र या चुकीचा खुप मोठा फायदा शिवसेनेने घेतला असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती.

या बैठकीत सम – समानचा फॉर्मुला ठरलेला असताना नेमके विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द फिरवला होता. तसेच धडधडीत खोटे बोलून वेळ मारण्याचा प्रयत्न केला. परंतु फडणवीसांनी खेळलेला खेळ त्यांच्याच अंगलट आला होता. हे आज मुनगंटीवार यांच्या बोलण्यावरून सिद्ध झालेले आहे.

Leave a comment

0.0/5