Skip to content Skip to footer

नुकसानग्रस्तांना वाढीव निधी मिळण्यासाठी आमदार योगेश कदमांचे यशस्वी प्रयत्न

नुकसानग्रस्तांना वाढीव निधी मिळण्यासाठी आमदार योगेश कदमांचे यशस्वी प्रयत्न

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची राज्य स्तरावर संबंधित विभागाकडून पाहणी पूर्ण झाली असून, पंचनामे देखील जलदगतीने करण्यात येत आहेत. त्याच दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे नित्याने मतदारसंघात दौरे करून नुकसानग्रस्त भागांची माहिती घेत आहेत. नुकतीच त्यांनी दापोली तालुक्यामधील कलानगर, कांगवई, विरसई, मौजे खरवते, आमखोल, डौली, माणकवणे, वांझळोली, उंबरशेत व आतगाव या गावांची पाहणी केली.

पाहणी नंतर तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवादही साधला. सतत केलेल्या मागणीनुसार नुकसानग्रस्तांना वाढीव स्वरुपात मिळणाऱ्या मदती बाबत माहिती दिली. राज्य सरकारतर्फे पूर्वी जाहीर करण्यात आलेली मदत पुरेशी नसल्याने ही मदत वाढीव स्वरूपात मिळावी यासाठी आमदार योगेश कदम यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संबंधित मंत्रीमहोदयांकडे मागणी केली होती.

Leave a comment

0.0/5