भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांचे विधान
“विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?” असं भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत विविध वक्तव्यं समोर येत आहेत. शेतकरी आंदोलनास काही राजकीय पक्षांची फूस आहे, या आंदोलनाच्या आड विरोधी पक्ष राजकारण करत आहेत, हे आंदोलन विरोधी पक्षांच्या ताब्यात गेलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी वरील विधान केलं आहे.
राकेश टिकैत यांना विचारण्यात आले की, जेव्हा पंतप्रधान मोदींसह त्यांचे अनेक मंत्री एमएसपी आणि बाजार समिती बाबत विश्वास देत आहेत, तरी देखील तुम्ही आंदोलन का करत आहात? तेव्हा टिकैत म्हणाले की, जर तुम्ही जुन्या घडामोडी पाहिल्या तर विश्वास ठेवण्याचे कुठलेच कारण दिसत नाही. जर सरकार कायद्यात बदल करण्यास तयार आहे. तर मग कायदे मागे घेण्यात काय अडचण आहे? हाच मुद्दा आहे की सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येत नाही.