Skip to content Skip to footer

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहे, सामनातून फेसबुकला समज….!

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहे, सामनातून फेसबुकला समज….!

वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकेतील मुख्य वर्तमान पत्राने जाहीर केलेल्या अहवालामुळे भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आढळून आली होती. तसेच सोशल मीडियाच्या जगात मोठी लढाई सुरु झालेली देखील पाहायला मिळाली. या अहवालानुसार भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअप नियंत्रित करत असून, त्याद्वारे द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. उद्योग व्यवसायातील किमान काही नितीनियम तुम्हाला पाळावेच लागतील. तुमचा धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर याकडे कानाडोळा करता येणार नाही, अशा शब्दात सामनातून फेसबुकवर हल्ला चढविला आहे.

तसेच भारतातील लोकसंख्या हाच फेसबुकचा मोठा बाजार आहे, हे सांगताना फेसबुकच्या व्यावसायिक धोरणावरही टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांनी काही द्वेष पसरविणारा मजकूर टाकला व त्यावर कारवाई करू नये म्हणून फेसबुकवर दबाव आणला, हे फेसबुक कंपनीनंही मान्य केले असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5