Skip to content Skip to footer

“फडणवीसांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य!” – विनायक राऊत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला आता खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शहांच्या हटवादीपणामुळे सतरा ते अठरा पक्ष एनडीएतून बाहेर पडले. भाजप आणि आणखी एक पक्ष सोडला, तर सर्वच पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. त्यामुळे विश्वासघातकी नेमकं कोण, हे आता दिसून येत आहे” असा टोला राऊत यांनी लगावला होता.

पुढे राज्याचे माजी मुखमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा राऊत यांनी टोला लगावला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य असल्याचे विनायक राऊत यांनी बोलून दाखविले होते.

केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल, मात्र शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचं मंदिर आहे. त्याच मंदिरातील दैवताने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एवढा मोठा आशिर्वाद ठेवला होता, म्हणून देशाला आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिसत आहेत” असा टोला विनायक राऊतांनी लगावला होता.

Leave a comment

0.0/5