Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्रामुळे राज्यपालांना १२ आमदारांची नियुक्ती करावीच लागणार ?

मागच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून त्यापैकी काही नावांना मंजुरी मिळवण्याच्या तयारीत ठाकरे सरकार आहे.

राज्य सरकारकडून वेळोवेळी १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल कोश्यारी यांना अनेक पत्रं पाठवून त्या गोष्टीची आठवण करून देण्यात आली होती. मात्र सुरवातीच्या काळात राज्यपाल कोश्यारी यांनी कोरोनाचे कारण पुढे करत या प्रकरणातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता कोरोनाच संसर्ग कमी झालेला असताना सुद्धा राज्यपाल ‘या’ विषयाकडे कानाडोळा करत आहे.

त्यामुळे आता ठाकरे सरकारने कायदेशीर सल्ला घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून एक पत्र राज्यपालांना लिहण्यात आले आहे. हे पत्र आता राज्यपालांना पाठवले जाईल. या पत्रात कायदेशीर युक्तिवाद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्यपाल १२ पैकी सरकारने सुचविलेल्या काही नावांना तरी मंजुरी देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5