आजवर २० जणांना तरी मदत केली का ? कंगनाला मिक्का सिंगचा टोला
अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर जोरदार सुरु झालेले असताना या वादात आता गायक मिक्का सिंगने उडी घेतलेली आहे. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. आता त्या पाठोपाठ मिक्का सिंगने कंगनाला टोला लगावला आहे. २० लोकांना तरी मदत केली आहेस का? असा सवाल त्याने कंगनाला केला आहे.
“आम्ही दिवसाला पाच लाखांपेक्षा अधिक लोकांना जेवण देतो. तू किमान २० लोकांना तरी मदत कर. सोशल मीडियावर स्वत:ला वाघिण म्हणतेस. वाघिण होणं सोपं आहे पण दररोज लोकांना मदत करण सोप नाही.” अशा शब्दात मिक्का सिंगने टोला लगावला आहे. त्यामुळे आता कंगना आणि मिक्का सिंग हा नवा वाद पाहायला मिळणार आहे.
you can join us we are providing 5 laks meals everyday to the needy people aap sirf 20 logo ke liye kuch kardo.. sherni banna aur vo bhi sirf news pe and twitter pe tau koi badi baat nahi… but anyway I am your great fan 😎😎😎 https://t.co/pF0YXNRAGU
— King Mika Singh (@MikaSingh) December 4, 2020
शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून, अभिनेत्री कंगना राणावत यांनी त्या आजीची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले होते.