Skip to content Skip to footer

भुजबळ, नाईक आणि तटकरे यांना सुद्धा पवारांनी पळविले होते बर आव्हाड साहेब..

“महाराष्ट्रात सध्या मुलं पळवणारी टोळी आलेली आहे तरी सर्व राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांना सांभाळा” असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता भाजपा पक्षावर केलेला आहे. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला होता आणि पुढे भाजपा पक्ष नगर जिल्यात वाढवण्याचे सुद्धा आश्वासन सुजय यांनी दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात सध्या जास्त दुखायला लागलेले आहे. म्हणूनच शरद पवार आणि महाराष्ट्रातील जनते समोर चमकायला काहीही बडबड सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चालू केली आहे.

आज जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा विचार करून प्रथम आपल्या पक्षात डोकावून पाहावे. आज छगन भुजबळ, नवी मुंबईचे गणेश नाईक आणि सुनील तटकरे यांना सुद्धा शरद पवार यांनी शिवसेना पक्षातून फोडून आपल्या पक्षात घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोर पळवायची प्रथा कोणी पाडली याचा अभ्यास करूनच जितेंद्र आव्हाड यांनी बोलावे. आज राष्ट्रवादी पक्षाकडून कडून सुजय यांनी तिकीट मागितलेली होती ती न दिल्यामुळेच सुजय यांनी दुसरा मार्ग स्वीकार केला. पण पार्थ अजित पवार यांना कशी काय
मागितल्यावर उमेदवारी मिळते याचा सुद्धा आव्हाड यांनी खुलासा करावा.

आम्ही आमच्या मुलांचे हट्ट पुरवतो हे बोलून शरद पवारानी जाहीर केले आहे की राष्ट्र्वादीतील सामान्य कार्यकर्त्यांना कधीच आमदार आणि खासदार बनायचा मौका भेटणार नाही हे आता पवार यांच्या बोलण्या वरून सिद्ध होत आहे. नगर मध्ये भाजपा बरोबर युती करून सत्तेत बसताना जितेंद्र आव्हाड आपण एक चुकार शब्द नाही बोलला आणि आता इतर पक्षाला कसे काय नाव ठेवता. त्यामुळे मराठीतील एक म्हण आपल्याला शोभून दिसते “आपले ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांच बघायचं वाकून” हीच आज तुमची परिस्थिती झालेली आहे.

Leave a comment

0.0/5