Skip to content Skip to footer

तेव्हाच अजित पवारांनी पार्थला रोखायला हवं होत – चंद्रकांतदादा पाटील

भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचार महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी एक मिशन हाती घेतले आहे. ते म्हणजे “मिशन बारामती” बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपाच्या कांचन कूल असा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे मावळमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे श्रीरंग बारणे असा सामना रंगणार आहे. याचबद्दल बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी मावळमध्ये लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे एकत्र आल्यानंतर पार्थ पवार जिंकणे आता शक्यच नसल्याचा दावा केला आहे. इतकेच काय तर अजित पवार यांनी आपल्या पुत्राचा पराभव आधीच ओळखून त्याला फॉर्म दाखल करण्यापासून रोखायला हवे होते, असा सूरही त्यांनी काढला.

पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले कर्जत, उरण आणि पनवेल असे तीन विधानसभा मिळू्न मावळ हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पार्थ पवार राजकारणात आपले पहिले पाऊल टाकत आहेत. ते पहिल्याच निवडणुकीत पराभूत व्हावेत असे आपल्याला वाटत नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत म्हणून दाखविले होते. सध्या चंद्रकातदादा पाटील हे बारामती जिल्यात भाजपा उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ या मतदार संघात तळ ठोकून बसले आहे.

मावळच्या जागेवर बोलताना मावळची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे जाण्याचा सावलच येत नाही. इथे ६ पैकी ४ आमदार हे युतीचे आहेत. मुळात लक्ष्मण जगताप हे खासदार श्रीरंग बारणे यांना मदत करणार नाही या गणितावरच अजित पवार यांनी आपल्या मुलाला म्हणजे पार्थला मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. परंतु येन वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या मनातील मतभेद बाजूला ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात बारणे यांना मदत करण्याचे ठरविले आहे याचं दरम्यान फॉर्म भरायला सुरवात झाली तेव्हाच अजित पवारांनी आपल्या मुलाला म्हणजे पार्थला फॉर्म भरण्यापासून रोखले पाहिजे होते असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a comment

0.0/5