Skip to content Skip to footer

काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचा फटका आनंद परांजपे यांना बसण्याची शक्यता

ठाणे लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आनंद परांजपे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे परंतु ही अडचण विरोधकांची नसून पक्षातील अंतर्गत वादाची आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार न करण्याचे ठरवून तसे पत्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिले होते. आणि आता येन निवडणुकीच्या प्रचारात नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरत भगत यांच्यात जुंपलेली
दिसून येत आहे. त्यांचा जबर फटका आनंद परांजपे यांना बसण्याचे चिन्ह दिसत आहे.

राष्ट्रवादीने प्रचाराला अनिल कौशिक यांना बोलावल्यावर दशरथ भगत यांचा नगरसेवक गट प्रचारापासून चार हात लांब राहत आहे. भगत यांना निमंत्रण दिल्यानंतर कौशिक नाराज होतात. कौशिक यांनी भर सभेत राष्ट्रवादीकडे नवी मुंबईचे महापौरपद देण्याची मागणी केली. यावर भगत यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसची ताकद आमदारकी लढवण्याची असताना सध्याचे जिल्हाध्यक्ष पालिकेच्या पदांची भीक मागत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यानं मध्ये भर सभेत शाब्दिक चकमक उडताना दिसत होती.

ठाण्यात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात थेट लढत असणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २००९ मध्ये मात्र शिवसेनेला येथे फटका बसला होता. पण २०१९ मध्ये येथे नाईक कुटुंबातून उमेदवार असेल अशी शक्यता होती. पण तसं झालं नाही. राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. आनंद परांजपे हे ठाण्यात राहत असले तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने २ लाख ८५ हजार मतांनी विजय मिळवला होता.

Leave a comment

0.0/5