Skip to content Skip to footer

जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीसाठी आता पर्यंत कधीही न भरून निघणारी खिंडार…

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षाला कायमचा राम-राम ठोकून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. तसे पहिले तर राष्ट्रवादी पक्षाला बीड जिल्ह्यात वाढवण्याचे काम जयदत्त क्षीरसागर यांनीच केले होते. आज दोन वेळा मंत्री पद भूषविलेले तसेच त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घोटाळयाचे आरोप होताना कोणत्याही घोटाळ्यात नाव न सापडणारी व्यक्ती म्हणजे जयदत्त क्षीरसागर, आज क्षीरसागर यांनी पक्ष सोडल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात खिंडार पडले आहे असेच जाणवते. तसेच येणाऱ्या काळात शिवसेना बीड जिल्ह्यात क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारेल हे सुद्धा नाकारता येणार नाही.

जयदत्त क्षीरसागर यांच्या सारख्या वरिष्ठ राजकीय व्यक्तीने राष्ट्रवादी सोडणे म्हणजे पवारांना येणाऱ्या विधानसभेला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे असेच आजच्या स्थितीतून दिसून येते. तसे त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण सुद्धा अनेक आहे. त्यातील एक कारण त्यांनी प्रसार माध्यमांना बोलून सुद्धा दाखविले होते. ‘वादळात ज्या दिव्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे हात त्या दिव्याभोवती धरले त्याच दिव्यामुळे हात पोळायला लागले तर काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित करत पवारांवर निशाणा साधला होता.

तसेच दुसरे प्रमुख कारण म्हणजे धनंजय मुंडे हे सुद्धा आहे. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे या लोकांना राष्ट्रवादी जवळ करते, असे म्हणत धनंजय मुंडेंवर टीकेची तोफ डागली होती. ज्या पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. विश्वासात घेतले जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर अशा राष्ट्रवादी पक्षात का राहावं? असा सवाल करत राष्ट्रवादी पक्षावर जोरदार टीका केली होती. आज क्षीरसागर सारख्या जुन्या आणि जाणत्या माणसाने राष्ट्रवादी सोडणे म्हणजे राष्ट्रवादी पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे असेच दिसून येते.

Leave a comment

0.0/5