विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी काल भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशात राष्ट्रवादीचे मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव वैभव पिचड आणि साताऱ्याचे राजे शिवेंद्रराजे भोसले यांचा सुद्धा समावेश होता.
या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजेंवर जोरदार टीका केली होती. आव्हाड म्हणाले, ‘शिवेंद्रराजे ज्या राजेंचा वारसा सांगतात त्या शिवाजीराजेंनी केवळ १६ मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला होता’ असे म्हणत शिवेंद्रराजेंवर चांगलाच निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना, शिवेंद्रराजे हे शिवरायांचे वारसदार नसून राजेंचे खरेच वारसदार आम्ही आहोत, असे आव्हाड म्हणाले.