सत्ता असो वा नसो, जनतेसाठी आक्रमक भूमिका घेणार – आदित्य ठाकरे
सर्वत्र विधानसभेची राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचारसभा सुरु झालेल्या आहे. त्यात सर्वच नेते एकमेकांचे वभाई काढण्यात व्यस्थ असलेले पाहायला मिळत आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मतदारांना विश्वास दिला आहे. मातोश्री येथे झालेल्या पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले ‘सत्ता आणि मंत्रिपदांपेक्षा आमची बांधिलकी जनतेच्या प्रश्नांशी आहे.
त्यामुळे आरेचा मुद्दा असो अथवा पीक विम्याचा, शिवसेना कायमच लोकांच्या प्रश्नांवर आक्रमक राहिली. सत्ता असो वा नसो पुढील काळातसुद्धा हीच भूमिका कायम असेल, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
हे ही वाचा-: “शेर आया शेर आया” प्रदीप शर्माच्या प्रचाराचे रॅप सोंग