Skip to content Skip to footer

“हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं…”, राऊतांचे सूचक ट्विट

काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला देशातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. इतकेच नव्हे भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थीत होते परंतु नव्या मुख्यमंत्र्यांना न भेटताच त्यांनी काढता पाय घेतला. मात्र शपथविधी होताच संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे. “हम शतरंज में कुछ ऐसा कमाल करते हैं, कि बस पैदल ही राजा को मात करते हैं” हा शेर संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ अखेर संपला. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि नितीन राऊत यांनी ईश्वरसाक्ष मंत्री पदाची शपथ घेतली.

Leave a comment

0.0/5