Skip to content Skip to footer

उत्तर प्रदेशातील हत्याकांडाचे पालघरसारखे राजकारण नको, संजय राऊत यांनी खडसावलं

उत्तर प्रदेशात दोन साधूंच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात राजकरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येचं पालघरप्रमाणे राजकारण करू नका. देश करोनाशी लढत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करतीलच, असा सल्ला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचे वृत्त समजताच संजय राऊतांनी या विषयायावरून भाजपला टोले लगावले आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निर्घृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. तसंच ट्विटच राऊत यांनी केलं आहे.

Leave a comment

0.0/5