“१०५ आमदार असतानाही सरकार बनवता आलं नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे!”
भारतीय जनता पक्षाकडून वारंवार महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या या दाव्याला महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर देत राज्यात स्थापन झालेल्या सरकारला कुठलाही धोका नसून सरकार पडणार नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या या दाव्यावर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, ‘१०५ आमदार असतानाही सरकार बनवता आल नाही हे त्यांच खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात’ अशी खोचक टीका अजित पवारांनी केली आहे. आता महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यांचे आशिर्वाद आहे, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’, असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.