टाकवे बुद्रुक/पुणे : ठोकळवाडी धरणाचे पाणी भात खाचरात आल्याने आंदर मावळातील धरणालगतची सगळी भात रोपे पाण्यात गेली आहेत. यंदाच्या हंगामात लावलेली भात रोपे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाच्या वर्षाचे नुकसान होत आहे. वास्तविक ही सगळी भात खाचरे टाटा पाॅवरने धरणासाठी संपादित केलेल्या जागेत आहेत. टाटाने तत्कालीन ब्रिटिश सरकारशी करार करून या जमिनी संपादित केल्या आहेत. त्याचा मोबदला…