महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सेना-भाजपा पक्षात शाब्दिक युद्ध चालू झालेले आहे. लोकसभा निवडणुकीला भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या युतीच्या फॉर्मुल्याची आठवण करून देताना खासदार संजय राऊत यांनी अक्षरशः भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावले आहे.
यातच सोमवारी दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी ठाण मांडल्याने राज्यातील राजकारणात वेगळी समीकरणे जुळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.…