Skip to content Skip to footer

राष्ट्र्वादीने किमान पाच हजार लोकांची गर्दी जमवून दाखवावी- विनोद तावडे

पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांच्या वर्धा येथील सभेला गर्दी नव्हती अशी टीका करणाऱ्या राष्ट्र्वादीने आपल्या सभेला पाच हजार लोकांची गर्दी जमवून दाखवावी अशी टीका राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ४४ अंश सेल्सियस तापमानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेऊन या सभेला निदान ५ हजार लोकांची गर्दी करून दाखवा, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आज दिले. विनोद तावडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील वर्धा येथील पहिल्या सभेला लोकांची गर्दी नव्हती असा दावा धनंजय मुंडे यांनी केला. हा दावा खोडून काढताना तावडे यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज वर्धा येथे आज झालेल्या सभेला सुमारे १ लाख लोकांची गर्दी होती.

तसेच अशोक चव्हाण यांच्या उत्तराला सडेतोड उत्तर देताना ‘पळ काढणारे चोर नाही, चौकीदार असतात’ या अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आदर्श सारखा मोठा घोटाळा करुन दरोडा टाकणाऱ्यांना पंतप्रधानांना चोर म्हणताना त्यांना काही वाटत नाही का? चंद्रपूर च्या उमदेवारीवरुन पक्षात माझे कोणी ऐकत नाही अशी जाहीर कबुली देणाऱ्या अशोक चव्हाणांनी का पळ काढला निवडणुकीत बायकोला लढण्यासाठी पुढे करतात त्यावरून लोकांना कळते की, कोण पळ काढतं आहे हे दिसतंय असंही तावडेंनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात भाजपा आणि त्यांचे विवर्धक असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील वाद वडण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5