Skip to content Skip to footer

पवारसाहेब चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो? – महादेव जानकर

लोकसभा निवडणुकी नंतर देशाचा पंतप्रधान कोण हे महायूओचे निश्चित झालेले आहे परंतु ५६ पक्ष एकत्र केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या नेत्यानं मध्ये अजून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला नाही आहे असंच चित्र दिसून येत आहे. शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. मात्र चार दोन खासदारांवर पंतप्रधानपद कसे शक्य आहे हो ? पुढे मागे आमच्या पक्षाला पंतप्रधानपदाची संधी मिळेल,तेव्हा पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न रासप पूर्ण करेल. असा टोला मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला. रांजणगाव गणपती येथे सभेला जाण्यापूर्वी जानकर यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जानकरांनी पवारांवर सडकून टीका केली होती.

पवार शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात. मग त्यांनी समाजात दरी का निर्माण केली ? त्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. खासगी साखर कारखानदारी आणली. ज्यांच्या नावाचा जप पवार करतात त्या शाहू महाराजांनी १८०२ मध्ये सर्वप्रथम आरक्षण दिले. मात्र शाहू महाराजांच्या जातीला आरक्षण मिळण्यासाठी १५० वर्ष लागली. मराठा समाजाचे ११मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. विरोधकांनी मराठा ओबीसी, मराठा धनगर यांच्यात भांडणे लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र शांत डोक्याने कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

जानकर म्हणाले , देशात सक्षम, समृध्द व संरक्षित सरकार हवे असेल तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी रासपची भुमिका आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील उच्चशिक्षित आहेत, चांगले संसदपटू आहेत प्रशासनाची जाण असणारे नेतृत्व आहे. अशा उमेदवारास दिलेले एक मत मोदींना पंतप्रधान बनवतील.यासाठी सरकारने आदिवासीना जेवढे बजेट आहे तेवढे धनगरांना दिले. सर्वोच्च न्यायालयात एसटी संदर्भातील प्रलंबित आहे.तेथेही सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. यामुळे आम्हीच धनगरांना आरक्षण देणार असल्याचा दावा जानकर यांनी केला.

Leave a comment

0.0/5