Skip to content Skip to footer

बारामतीचे पार्सल बारामतीत परत पाठवा – देवेंद्र फडणवीस

देशाच्या सीमा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत हे ठरविणारी ही निवडणूक आहे. देश मोदींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाखिचडी आघाडीला धडा शिकवा. या निवडणुकीमध्ये बारामतीसह माढा हादरला आहे. बारामतीचे पार्सल तुमच्याकडे आले आहे ते परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मावळ मतदार संघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे आयोजन पनवेल येथे करण्यात आलेले होते.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. या पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेतली जात होती. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात आले. पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती, पण तेव्हाच्या सरकारमध्ये ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत आहे. विरोधकांची अवस्था बिकट झाली आहे. शरद पवार यांनी माढाच्या पिचवरून पळ काढला. कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ही फडणवीस यांनी सभेत बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5