Skip to content Skip to footer

राज्यातील ६७० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या ६७० अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी) करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा पोलीस मुख्यालयातून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. शुक्रवारी आणखी काही अधिकाºयांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश निघण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

एकाच पोलीस घटकात कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच काही विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षकांमध्ये ७३ जणांना सध्याच्या ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर १४ उपनिरीक्षकांना विशेष सुरक्षा दलात बदली करण्यात आली आहे. तर ३३६ साहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. २१२ निरीक्षकांना बदल्या तर ३५ जणांना विनंतीनुसार एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना विभागाच्या समितीकडून बदल्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जात आहे.

Leave a comment

0.0/5