उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला आहे. यावेळी स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचेही पवारांनी बोलून दाखविले आहे.
उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. बरोजगारांना रोजगारक्षम बनवणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली १० वी उत्तीर्णांनाही रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले.