Skip to content Skip to footer

राज ठाकरे यांच्या टीकेला आता शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे प्रतिउत्तर

राज ठाकरे यांच्या टीकेला आता शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे प्रतिउत्तर.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि कोरोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही” असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

यावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “शुभ बोल रे नाऱ्या… राज्य सरकार चांगलं काम करत आहे. कामाचं कौतुकही केलं पाहिजे,” असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पुढे बोलताना देशाची म्हणाले की, “शुभ बोल रे नाऱ्या एवढंच मी म्हणेन. सरकार चांगलं काम करत आहे. त्यावर चांगलं बोललं पाहिजे. सरकार जनतेच्या पाठीशीही उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे. त्यातील कमतरता आम्ही भरून काढू. पण सरकारच्या चांगल्या कामांचं कौतुकही व्हायला हवं,” असे देसाई म्हणाले.

Leave a comment

0.0/5