कोरोनाच्या वाढत्या संकटात मागच्या चार महिन्यांपासून मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यातच मुंबईत कोरोना रुग्नांच्या संख्येत वाढ होत असलेली पाहून मनपाने मुंबईत मास्क घालणे बंधनकारक केले होते. तसेच मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाही करण्याचे आदेश दिले होते. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून मनपाने दंडात्मक कारवाही म्हणून १ हजार पर्यंत दंड आकारण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते.
९ एप्रिल २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० दरम्यान ‘मास्क’न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या एकूण २ हजार ७९८ नागरिकांकडून रुपये २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त ‘फेसमास्क’ योग्यरित्या परिधान न करणा-या व्यक्तींना समज देण्याची कार्यवाही केल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.आज महापालिकेद्वारे ‘मास्क’ वापरण्याविषयक जनजागृती सातत्याने केली जात आहे.