Skip to content Skip to footer

योगीनीं लोकशाहीचा गळा घोटाळा तरीही मोदी गप्प का ? – संजय राऊत

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हाथरसच्या घटनेवरून भाजपचा समाचार घेतला. हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरेतर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या मुलीच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेबाबत सत्य सांगावे. हाथरसच्या घटनेमुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना त्यावर संताप व्यक्त करायचा आहे. पण जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच लोकं मौन बाळगून आहेत.

पुढे पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, पीडित मुलीचा मृतदेह संशयास्पद जाळला गेला. यातून स्वतः चे पाप जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदुत्वाच्या राज्यात हा प्रकार घडतो आणि रामराज्य म्हणवल जातं. पण ही दुर्देवी घटना पाहता सितामाई सुद्धा आक्रोश करत असेल असे म्हणत उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. रामाच्या भूमीत सर्व नियम आणि कायदे उधळून लावले आहेत. हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असून त्यावर पंतप्रधान मोदी गप्प का?, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5