Skip to content Skip to footer

भाजपा म्हणजे भंगार पक्ष, ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमुळे तेथील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सत्तेत असलेला तृणमूल काँग्रेस आणि सत्तेचे स्वप्न पाहत असलेला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आणि राष्ट्रीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. त्यात गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जी विरोधात युद्धच पुकारले आहे.

दरम्यान एका सभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. भाजपा आता भंगार पक्ष बनला आहे. ज्या दिवशी भाजपाचा निवडणुकीत पराभव होईल त्या दिवशी ट्रम्प समर्थकासारखे भाजपा समर्थक राडे करतील अशी घणाघाती टीका बॅनर्जी यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका जवळ आल्यापासून तृणमूल काँग्रेसचे बडे नेते पक्षाला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश करत आहे. यावर होत असलेल्या चर्चेवर बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, आज अनेकजण केंद्रीय तपास यंत्रणेच्या भीतीने भाजपात प्रवेश करत आहेत. अनेकांनी पैसे कमावले होते ते आता भितीने भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपा भंगार पक्ष झाला आहे. दुसऱ्या पक्षातील बेक्कार लोकांना आपल्या पक्षात घेत आहे असे बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5